*चाळीस वर्षानंतर भरली शाळा,कळंबु हायस्कुल इ.10 वी ची बॅच (1984- 85)*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*चाळीस वर्षानंतर भरली शाळा,कळंबु हायस्कुल इ.10 वी ची बॅच (1984- 85)*
*चाळीस वर्षानंतर भरली शाळा,कळंबु हायस्कुल इ.10 वी ची बॅच (1984- 85)*
कळंबु(प्रतिनीधी):-आपण लोकांचे देणे लागतो या भावनेतून कळंबु शेतकी विद्यालयाचे माजी विद्यार्थी सन 1984-85 (इ.10 वी)ची बॅच याच्यातील काही विद्यार्थी एकत्र येत मोबाईल द्वारे संपर्क साधून एक कल्पना सुचली. आज-काल जवळपास सगळ्यांकडे मोबाईल असल्यामुळे आपण जर सगळे विद्यार्थी व विद्यार्थिनी मित्र मैत्रीणी एकत्र येऊन गेट-टुगेदर कार्यक्रम जर ठेवला तर .या संकल्पनेतून एकमेकांशी संपर्क साधून जवळपास 55 विद्यार्थी विद्यार्थिनी एकत्र आले .व गेल्या चार-पाच महिन्यापासून गेट-टुगेदर च्या संकल्पनेला 15 सप्टेंबरला 2024 ला पूर्णविराम दिला गेला.व जवळपास 40 च्या आसपास वर्गमित्र मैत्रिणी एकत्र येऊन नगाव बारी येथील हॉटेल रसराज धुळे येथे सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बऱ्याच मित्र-मैत्रिणींनी अनुभवाचे बोल सांगितले. परत नाच गाण्यांमध्ये शांतीलाल बागले यांनी भारुड गायले. ह .भ. प. महाराज शशिकांत ठाकूर यांनी आई वरुण दोन-तीन गाणे गायले. राज नारायण जाधव यांनीही ऐराणी गाणे म्हटले. व ढोलकी वादन प्रेमराज पाटिल व शशिकांत ठाकुर यांनी साथ दिली. नंतर मैत्रिणींनी संगीत खुर्चीचा खेळ खेळला. व आशा बोरसे यांनी संगीत खुर्ची जिंकली. मनोगतातून व परिचयातून सर्वांनी कोणाची मुलं फॉरेनला आहेत कोणाची मुलं डॉक्टर, इंजिनीयर आहेत कुणाच्या मुला मुलीचे लग्न झाले. काहींना नातवंडे आहेत. व जवळपास सर्वच जण चांगल्या पद्धतीने जीवनाची वाटचाल करीत असल्याचे सांगितले. जिथे दोन घास प्रेमाने खाता येईल अशी पंगत आणि मनमोकळे करता येईल अशी संगत आयुष्यात लाभली की जगण्यात रंगत वाढत असते. चांगली माणसे एकत्र आली की त्यांची प्रगती कोणी रोखू शकत नाही. पाच तासाच्या कार्यक्रमात सगळ्यांनी खूप एन्जॉय केला. व मध्यंतरानंतर सगळ्यांनी एकत्र येत भोजनाचा आस्वादही घेतला. अशा पद्धतीचा हा कार्यक्रम म्हणजे जवळपास 40 वर्षानंतर परत एकदा शाळा भरवली गेली. व विद्यार्थ्यांसारखेच अनुभव सगळ्यांनी घेतले. यात प्राध्यापक इंजिनिअर, डॉक्टर, मंत्रालयात सचिव व शिक्षक व बरेच नोकर वर्गातील मंडळी उपस्थित होते. व शेतकरी मित्र मंडळी उपस्थित होते. माजी सरपंच अमरजीत कुवर यांनी कळंबू गावासाठी काय करता येईल का म्हणून सर्व मित्र-मैत्रिणींना आपण ज्या शाळेत शिकलो त्या गावासाठी काय करता येईल म्हणुन चांगल्या कामाची अपेक्षा ठेवली .व नंतर राज नारायण जाधव यांनी शारीरिक फिटनेस संदर्भात अतिशय चांगली माहिती दिली. प्रा.संजय देवरे यांनी सांगितले की या आधी पण आमच्या 1985 च्या बॅचच्या विद्यार्थींनी एकत्र येत व मागिल /पुढील बॅच एकत्र आणत कळंबु हायस्कुलच्या सर्व शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारींचा सहकुटुंब सत्कार केला. व गुरुशिष्य सोहळा कार्यक्रम केला होता. व कळंबु हायस्कुलला वाटर फिल्टर बसविले.व चालु वर्षी सुद्दा मराठी शाळेला पेन, वह्य, दप्तर देण्यात आले. अशा पद्धतीने आपण समाजाचे देणे लागतो ही जाणीव कायम स्मरणात ठेवावी व यथाशक्ती प्रमाणे मदत करावी. कार्यक्रमासाठी मेहनत धुळे येथे वास्तव्यास असलेले मंडळ कृषि अधिकारी भालेराव बोरसे, माध्यमिक शिक्षक नरेंद्र मंडळे व मुंबई येथे प्राध्यापक असलेले संजय देवरे, शांतीलाल बागले व नंदुरबार येथील भास्कर कुवर यांनी मेहनत घेतली. पुणे, ठाणे, मुंबई, नाशिक, सुरत, नवसारी, जळगाव, धुळे, नंदुरबार, कळंबुसह जवळपास सर्वच मित्र/मैत्रिणी उपस्थित होते. आवर्जुन आभार मानले पाहिजे ज्या मैत्रीनींचे मिस्टरांनी गेट टुगेदर कार्यक्रमाला आमच्या वर्ग मैत्रीनींणा परवानगी दिली. सुरवातीला मयत झालेल्या मित्र/मैत्रीनींणा श्रद्धांजली अर्पण केली. सुत्रसंचालन शांतीलाल बागले, प्रास्ताविक नरेंद्र मंडळे, मनोगत भास्कर कुवर व सुरेखा देसले यांनी केले. आभार प्रदर्शन संजय देवरे यांनी केले. अशा प्रकारे खेळीमेडीच्या वातावरणात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.