*स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन*
*स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन*
नंदुरबार(प्रतिनीधी):-इयत्ता 10 वी 12 वी तसेच त्यानंतरच्या व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी महाविद्यालयामध्ये प्रवेशित असलेल्पा अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी सामाजिक न्हाय विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु करण्यात आलेली असून या योजनेच्या लाभासाठी पात्र विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यानी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना भोजन, निवास, निर्वाह भत्ता तसेच शैक्षणिक भत्ता इ. सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असून शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या तथा शासकीय वसतीगृहात प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशासाठी 50 टक्के गुण असणे अनिवार्य आहे. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना 3 टक्के आरक्षण असेल व गुणवत्तेची टक्केवारी 40 टक्के इतकी राहील. त्यासाठी त्यांची गुणवत्ता यादी स्वतंत्र तयार करण्यात येईल. भोजन भत्ता रुपये 25 हजार, निवास भत्ता रुपये 12 हजार, व निर्वाह भत्ता रुपये 6 हजार या व्यतिरिक्त वैद्यकीय/ अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतीवर्षी रुपये 5 हजार व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना 2 हजार शैक्षणिक वर्षासाठी देण्यात येतील. यासाठी विद्यार्थी शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यास पात्र असावा, विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा, शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेला असावा, विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौद्ध या प्रवर्गातील असावा, विद्यार्थ्यांने जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील, विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे, तसेच केंद्र शासनामार्फत ज्या-ज्या वेळी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मयदित वाढ होईल त्यानुसार या योजनेसाठी पालकाची उत्पन्न वार्षिक मर्यादा त्याप्रमाणे राहील, विद्यार्थ्याने स्मृतःचा आधार क्रमांक व त्याने ज्या बँकेत राष्ट्रीयकृत / शेडुल्ड बँकेत खाते उघडले असेल त्या खात्माशी संलग्न असावे, विद्यार्थ्यांचा पॅन कार्ड अनिवार्य आहे, विद्यार्थी स्थानिक रहिवासी नसावा, पदवी, पदविका, दोन वर्षापेक्षा कमी नसणाऱ्या कोणत्याही मान्यताप्राप्त अभ्यासक्रमास सदर विद्यार्थ्यास पुढे लाभ घेण्यासाठी किमान 50 टक्के गुण किंवा त्याप्रमाणात ग्रेडेशन/ सीजीपीओ असणे आवश्यक राहील. या योजनेच्या लाभासाठी वर्ष 2024-25 या शैक्षणिक वर्षात नंदुरबार जिल्ह्याच्या ठिकाणी महाविद्यालयात प्रवेशित असलेल्या अनु. जाती व नवबौध्द घटकातील पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, नंदुरबार डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्साय भवन टोकरतलाव रोड, नंदुरबार येथे संपर्क साधावा, असेही वसावे, यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.