*आदिवासींच्या गौरवशाली परंपरा व इतिहासाचा गौरव करण्यासाठी आदिवासी दिनाचे औचित्य-शशिकांत घासकडबी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आदिवासींच्या गौरवशाली परंपरा व इतिहासाचा गौरव करण्यासाठी आदिवासी दिनाचे औचित्य-शशिकांत घासकडबी*
*आदिवासींच्या गौरवशाली परंपरा व इतिहासाचा गौरव करण्यासाठी आदिवासी दिनाचे औचित्य-शशिकांत घासकडबी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-विश्व आदिवासी दिनाचे औचित्य साधून भारतातील आदिवासींच्या गौरवशाली इतिहास व परंपरेचा सन्मान व्हावा असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक शशिकांत घासकडबी यांनी आज ज.ग. नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित विश्व आदिवासी दिनाच्या कार्यक्रमात बोलताना केले. यावेळी त्यांनी आदिवासी संस्कृतीचे रक्षण करणाऱ्या क्रांतीवीरांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. तसेच देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या वीर तंट्याभील, वीर खाज्या नाईक, संत गुलामहाराज, रावलापाणी स़ंघर्ष आदिं प्रेरणादायी इतिहासाची माहिती दिली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य धर्मेंद्र मराठे होते तर उपमुख्याध्यापक डॉ.गिरीश पवार, पर्यवेक्षक टी एन पाडवी तसेच आदिवासी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून समीक्षा वसावे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात या मोगी माता आणि त्यांच्या यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सौ. वर्षा घासकडबी यांनी केले. यावेळी त्यांनी विश्व आदिवासी गौरव दिनाचे महत्व विशद केले. यावेळी महाविद्यालयातील आदिवासी शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. गौरी बैरागी हीने केले. यावेळी महाविद्यालयांतील विज्ञान शाखेच्या विद्यार्थिनींनी आदिवासी वेशभूषेत पारंपरिक नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अश्विनी पाटील हिने केले. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. मिनल वसावे आणि प्रा. सुवर्णा गिरासे यांनी केले. कार्यक्रमासाठी फलक लेखन चेतना माळी व अक्षरा भोई यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापकवृंदांनी विशेष परिश्रम घेतले.



