*जंगल, जमीन आणि माणूसपण जपणाऱ्या आदिवासी संस्कृतीला सलाम!आदिवासी बांधवांचा स्वाभिमान, हक्क आणि संस्कृतीच्या सन्मानासाठी शासन कटिबद्ध- पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या जागतिक आदिवासी दिना
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जंगल, जमीन आणि माणूसपण जपणाऱ्या आदिवासी संस्कृतीला सलाम!आदिवासी बांधवांचा स्वाभिमान, हक्क आणि संस्कृतीच्या सन्मानासाठी शासन कटिबद्ध- पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या जागतिक आदिवासी दिना
*जंगल, जमीन आणि माणूसपण जपणाऱ्या आदिवासी संस्कृतीला सलाम!आदिवासी बांधवांचा स्वाभिमान, हक्क आणि संस्कृतीच्या सन्मानासाठी शासन कटिबद्ध- पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या जागतिक आदिवासी दिनानिमित्त शुभेच्छा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-आदिवासी असणे ही केवळ एक सामाजिक ओळख नाही, तर निसर्गाशी असलेल्या माणसाच्या हजारो वर्षांच्या नात्याची जिवंत साक्ष आहे. जंगल, जमीन आणि माणूसपण जपत आपली समृद्ध संस्कृती, परंपरा आणि निसर्गनिष्ठ जीवनमूल्यांचा वारसा पुढे नेणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा, अशा शब्दांत राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जागतिक आदिवासी दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या शुभेच्छा संदेशात पालकमंत्री हसन
मुश्रीफ म्हणाले की, नंदुरबारच्या सातपुड्याच्या कुशीत पिढ्यान्पिढ्या वास्तव्य करणाऱ्या आदिवासी बांधवांचे निसर्गाशी असलेले नाते अतिशय दृढ आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. या बांधवांनी जंगलाकडे केवळ संपत्ती म्हणून पाहिले नाही, तर त्याला आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग मानले. जमिनीकडे मालमत्ता म्हणून नव्हे, तर माता म्हणून पाहिले. निसर्गाशी संघर्ष करण्याऐवजी त्याच्याशी सहजीवन साधण्याचा मार्ग या बांधवांनी हजारो वर्षांपासून जपला आहे. ही जीवनदृष्टी आजच्या काळात संपूर्ण समाजासाठी मार्गदर्शक ठरणारी आहे. काळाच्या ओघात सामाजिक व्यवस्था बदलल्या, जीवनपद्धती बदलल्या आणि विकासाच्या व्याख्याही बदलत गेल्या. मात्र, या बदलांच्या प्रवाहातही आदिवासी बांधवांनी आपली स्वतंत्र सांस्कृतिक ओळख समर्थपणे टिकवून ठेवली आहे. आपली बोलीभाषा, लोककला, लोकपरंपरा, रूढी, श्रमसंस्कृती, सामूहिक जीवनपद्धती आणि निसर्गाशी असलेले अतूट नाते या बांधवांनी आजही जपले आहे. हा सांस्कृतिक वारसा नंदुरबार जिल्ह्याची ओळख अधिक समृद्ध करणारा असल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नमूद केले. जागतिक आदिवासी दिन हा केवळ शुभेच्छा देण्याचा दिवस नसून आदिवासी बांधवांच्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा, त्यांच्या अस्मितेचा सन्मान करण्याचा आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असलेली बांधिलकी अधिक दृढ करण्याचा दिवस आहे. आदिवासी बांधवांचा स्वाभिमान, त्यांचे हक्क, त्यांची संस्कृती, परंपरा आणि विकासाच्या आकांक्षांचा सन्मान करणे हीच या दिवसाची खरी संकल्पना आहे.
आदिवासी बांधवांच्या शिक्षण, आरोग्य, रोजगार, कौशल्य विकास आणि सामाजिक-आर्थिक प्रगतीसोबतच त्यांच्या सांस्कृतिक अस्मितेचे जतन होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. विकासाच्या प्रक्रियेत आदिवासी बांधवांचा सक्रिय सहभाग वाढावा, त्यांच्या जीवनमानात सकारात्मक परिवर्तन घडावे आणि नव्या पिढीला प्रगतीच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
“सातपुड्याच्या मातीचा स्वाभिमान जपणाऱ्या, निसर्गाशी आपले नाते अबाधित ठेवणाऱ्या आणि आपल्या समृद्ध संस्कृतीचा वारसा अभिमानाने पुढे नेणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील सर्व आदिवासी बंधू-भगिनींना जागतिक आदिवासी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. जंगल, जमीन आणि माणूसपण जपणाऱ्या या समृद्ध आदिवासी संस्कृतीला माझा मनापासून सलाम,” अशा शब्दांत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.



