*‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’, नंदुरबार जिल्ह्यातील 5 हजार शेतकऱ्यांना 59 कोटींचा लाभ*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’, नंदुरबार जिल्ह्यातील 5 हजार शेतकऱ्यांना 59 कोटींचा लाभ*
*‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’, नंदुरबार जिल्ह्यातील 5 हजार शेतकऱ्यांना 59 कोटींचा लाभ*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्र शासनाच्या "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, 2026" या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत आज एक मोठा टप्पा गाठण्यात आला. राज्यातील आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या सुमारे 6.62 लाख पात्र शेतकरी लाभार्थ्यांच्या कर्जखात्यावर एकूण 5 हजार 028 कोटींची रक्कम थेट ऑनलाईन पोर्टलद्वारे हस्तांतरित करण्यात आली. यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील 5 हजार 778 पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर 59 कोटी 23 लाख 23 हजार 861 इतकी रक्कम थेट वर्ग करण्यात आली असल्याची माहिती सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक एस.वाय. पुरी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
32 लाख कर्जखात्यांचा डेटा पोर्टलवर:
राज्यातील 30 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, 12 राष्ट्रीयीकृत बँका आणि इतर खाजगी बँका अशा एकूण 53 बँकांनी महाआयटीच्या पोर्टलवर शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती अपलोड केली असून, सुमारे 32 लाख कर्जखात्यांचा डेटा संकलित झाला आहे. सहकार आयुक्त व निबंधक (पुणे) यांच्या माहितीनुसार 25 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या पहिल्या पात्र यादीत 16.96 लाख शेतकऱ्यांचा समावेश होता, ज्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील 17 हजार 543 शेतकऱ्यांचा समावेश आहे. 7 ऑगस्ट 2026 पर्यंत जिल्ह्यातील 10 हजार 600 कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. नवीन पीक कर्जाचा मार्ग मोकळा: शासनाने सहकार आयुक्तांकडे 22 जुलै रोजी 1 कोटी आणि 30 जुलै रोजी 7000 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला होता. आज प्रत्यक्ष रक्कम हस्तांतरित झाल्यामुळे योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना चालू खरीप हंगामासाठी तातडीने नवीन पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश सर्व बँकांना देण्यात आले आहेत. ई- केवायसी (e-KYC) पूर्ण करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन:
पहिल्या पात्र यादीत नाव असूनही ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी (e-KYC) किंवा आधार प्रमाणीकरण प्रक्रिया अद्याप बाकी आहे, त्यांनी तात्काळ संबंधित बँक किंवा ‘आपले सरकार सेवा केंद्राशी’ संपर्क साधून ई-केवायसी e-KYC पूर्ण करावी, जेणेकरून लाभ खात्यावर जमा होईल, असेही आवाहन सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक पुरी यांनी या शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.



