*सार्वजनिक सुनावणी शांततेत पार; सरपंचांच्या स्पष्ट भूमिकेची प्रशासनाकडे नोंद, निकालाकडे सर्वांचे लक्ष*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सार्वजनिक सुनावणी शांततेत पार; सरपंचांच्या स्पष्ट भूमिकेची प्रशासनाकडे नोंद, निकालाकडे सर्वांचे लक्ष*
*सार्वजनिक सुनावणी शांततेत पार; सरपंचांच्या स्पष्ट भूमिकेची प्रशासनाकडे नोंद, निकालाकडे सर्वांचे लक्ष*
राजापूर(प्रतिनिधी):-अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या मुख्यालयासंदर्भात उपविभागीय अधिकारी कार्यालय, राजापूर येथे आयोजित करण्यात आलेली सार्वजनिक सुनावणी नियोजित वेळेनुसार व शांततापूर्ण वातावरणात पार पडली. सुनावणीदरम्यान विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, प्रतिनिधी आणि नागरिकांना आपापली भूमिका मांडण्याची संधी देण्यात आली. हरकतींची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काही ग्रामपंचायतींकडून दोन्ही प्रस्तावित ठिकाणांच्या समर्थनार्थ भूमिका नोंदविण्यात आल्याची बाब समोर आली होती. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतींची नेमकी व स्पष्ट भूमिका प्रशासनासमोर प्रत्यक्ष मांडली जावी, या उद्देशानेच ही सार्वजनिक सुनावणी आयोजित करण्यात आली असावी, असे मत सुनावणीसाठी उपस्थित असलेल्या काही सरपंचांनी व्यक्त केले. सुनावणीदरम्यान प्रत्येक सरपंचाला स्वतंत्रपणे आपली भूमिका मांडण्याची संधी देण्यात आली. तसेच, “आपल्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव आहे का?” आणि “आपल्या ग्रामपंचायतीसाठी कोणते ठिकाण अधिक सोयीचे ठरेल?” अशा स्वरूपाचे प्रश्नही प्रशासनाकडून विचारण्यात आल्याचे उपस्थितांनी सांगितले. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीची भूमिका कोणत्याही संभ्रमाशिवाय नोंदविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची चर्चा होती. सुनावणीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रांत कार्यालय परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संपूर्ण प्रक्रिया शांततापूर्ण आणि सुरक्षित वातावरणात पार पडली. यावेळी काही व्यक्तींनी वैयक्तिक मतभेदातून टिपण्या व टिप्पणी केल्याची चर्चा उपस्थितांमध्ये होती. मात्र, त्याचा सुनावणीच्या प्रक्रियेवर कोणताही परिणाम झाला नाही. एकूणच संपूर्ण सुनावणी खेळीमेळीच्या वातावरणात, नियोजनबद्ध पद्धतीने आणि कोणताही अनुचित प्रकार न घडता पूर्ण झाल्याचे मत काही उपस्थित प्रतिनिधींनी व्यक्त केली सुनावणीत कोणत्या ग्रामपंचायतीने कोणती भूमिका मांडली, याची अधिकृत माहिती प्रशासनाकडून पुढील प्रक्रियेनंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान, उपस्थितांमध्ये झालेल्या चर्चांवरून पाचलच्या समर्थनाला अधिक लोकसमर्थन असल्याची भावना व्यक्त होत होती. आता सुनावणीत नोंदविण्यात आलेल्या भूमिका, हरकती आणि प्रशासकीय निकषांच्या आधारे प्रशासन कोणता निर्णय घेते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.



