*गोरक्षकांच्या मागण्या तत्काळ पुर्ण करा,विजय चौधरी यांची पोलिस प्रशासनाकडे मागणी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*गोरक्षकांच्या मागण्या तत्काळ पुर्ण करा,विजय चौधरी यांची पोलिस प्रशासनाकडे मागणी*
*गोरक्षकांच्या मागण्या तत्काळ पुर्ण करा,विजय चौधरी यांची पोलिस प्रशासनाकडे मागणी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार शहरातील होणाऱ्या गोवंश हत्या संदर्भात शहरातील शेकडो संतप्त गोरक्षकांनी भाजपाचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी यांची त्यांच्या “विजयपर्व” निवासस्थानी जाऊन भेट घेतली व आपली कैफियत मांडली. या प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी, पोलीस निरीक्षक संदीप पाटील व मंदार चौधरी आदि उपस्थित होते.
या बाबत हकीकत अशी की, 5 जुलै 2026 रोजी मध्यरात्री गोरक्षक व गोतस्कर यांच्यात झालेल्या वादातून तणावाचे वातावरण झाले होते. त्या अनुषंगाने 7 जुलै 2026 रोजी गोरक्षकांकडुन भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र धार्मिक तेढ निर्माण होऊ नये म्हणुन पोलिसांनी खबरदारी घेत मोर्चाला परवानगी नाकारली प्रमुख व्यक्तिंना ताब्यात घेतले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या गोरक्षकांनी थेट “विजयपर्व” निवास्थान गाठले व विजय चौधरी यांच्याकडे आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. परिस्थितीचे गंभीरता लक्षात घेता विजय चौधरी यांनी पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना बोलवले. या प्रसंगी गोरक्षकांनी आपली भूमिका स्पष्ट करत सांगितले की, गोवंश हत्या व तस्करी शंभर टक्के थांबली पाहिजे, ठीक- ठिकाणी नाकाबंदी केली पाहिजे, आंदोलनातील प्रमुख व्यक्तिंना ताब्यात घेतले आहे त्यांना तत्काळ सोडून दिले पाहिजे, गोरक्षणवरील गुन्हे मागे घेतले पाहिजे व गोतस्करांवर मकोका कायदा कार्यवाही करणे यासह विविध मागण्या गोरक्षकांनी विजय चौधरी यांचा समोर मांडल्या. या वेळेस उपस्थित असलेले पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. गोरक्षकांच्या मागण्यांबाबत विजय चौधरी यांनी पोलिस अधीक्षक अश्विनी सानप यांच्याशी गोरक्षकांच्या उपस्थिती भ्रमण दूरध्वनीद्वारे संपर्क केला व गोरक्षकांच्या भावना व त्यांच्या मागण्या संदर्भात सकारात्मक प्रतिसाद देण्याची मागणी केली. त्यानुसार पोलिस अधीक्षक अश्विनी सानप यांनी सकारात्मक प्रतिसाद देत गोरक्षांच्या मागण्या मान्य केल्यात व तिढा सुटला, चर्चेत स्थानिक गुन्हे विभागाचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी देखील सहभाग घेतला. भाजपा विभागीय संयोजक विजय चौधरी यांनी गोरक्षकांना शांतता राखण्याचे अवाहन केले.
विजय चौधरी यांच्या केलेल्या मध्यस्थीमुळे शांतता प्रस्थापित होण्यात मदत झाली. सकाळपासून नंदुरबार शहरात पोलिसांनी बंदोबस्त ठेवला. विजय चौधरी यांनी शांततेसाठी केलेले प्रयत्न व पोलिसांनी घेतलेली सकारात्मक भूमिका गोरक्षकांनी ठेवलेले संयम याचे सर्वत्र कौतुक होत आहे.



