*मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव व इंदापूर बायपासची जनआक्रोश समितीकडून पाहणी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव व इंदापूर बायपासची जनआक्रोश समितीकडून पाहणी*
*मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव व इंदापूर बायपासची जनआक्रोश समितीकडून पाहणी*
रायगड(प्रतिनिधी):-मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव-इंदापूर दरम्यान रखडलेल्या कामाबाबत जनआक्रोश समितीच्या प्रतिनिधींनी माणगाव आणि इंदापूर बायपासची पाहणी केली. या पाहणीदरम्यान संबंधित ठेकेदारांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून कामाच्या प्रगतीबाबत माहिती घेण्यात आली.
माणगाव बायपासच्या कामाबाबत ठेकेदारांनी सांगितले की कोणत्याही तांत्रिक किंवा प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्या नाहीत तर 31 मेपर्यंत बायपासची किमान एक बाजू वाहतुकीसाठी सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल. सध्या काम सुरू असून ते वेगाने पूर्ण करण्याचा निर्धार ठेकेदारांनी व्यक्त केला. मात्र इंदापूर बायपासचे काम अजूनही प्रतीक्षेतच आहे. काही कारणांमुळे या ठिकाणी अपेक्षित गतीने काम सुरू झालेले नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण दिसून येत आहे.
तसेच 'कोलेटी' येथील काम सध्या पूर्णपणे बंद असल्याचेही पाहणी दरम्यान निदर्शनास आले. हे काम तातडीने सुरू करून पूर्ण करण्याची मागणी जनआक्रोश समितीने केली आहे. मुंबई–गोवा महामार्गाचे काम अनेक वर्षांपासून रखडले असून त्यामुळे कोकणातील नागरिकांना वाहतुकीच्या मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शासन, प्रशासन आणि ठेकेदारांनी कामाला गती देऊन हा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करावा अशी अपेक्षा जनआक्रोश समितीने व्यक्त केला. सदर निरीक्षण व पाहणी मोहिम दौरा जनआक्रोश समितीचे अध्यक्ष अजय यादव, कार्याध्यक्ष सुरेंद्र पवार, उपाध्यक्ष अमोल चव्हाण आणि सल्लागार अरविंद तांबे यांच्या उपस्थितीत पार पडला.



