*माझी वसुंधरा अभियान 5.0 चा निकाल जाहीर आदर्श गाव विरसई पुन्हा कोकण विभागात प्रथम*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*माझी वसुंधरा अभियान 5.0 चा निकाल जाहीर आदर्श गाव विरसई पुन्हा कोकण विभागात प्रथम*
*माझी वसुंधरा अभियान 5.0 चा निकाल जाहीर आदर्श गाव विरसई पुन्हा कोकण विभागात प्रथम*
दापोली(प्रतिनिधी):-गतवर्षी महाराष्ट्र शासन पुरस्कृत माझी वसुंधरा अभियान 4.0 चा निकाल जाहीर झाला तेव्हा संपूर्ण कोकण विभागातील (रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर) पाच जिल्ह्यांमधून दापोली तालुक्यातील आदर्श गाव ग्रामपंचायत विरसईने प्रथम क्रमांक पटकावत मानाचा (₹50 लाख) पुरस्कार मिळवला होता. आज पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे! माझी वसुंधरा अभियान 5.0 चा निकाल जाहीर झाला असून ग्रामपंचायत विरसईने पुन्हा कोकण विभागातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशामध्ये सरपंच मनोरमा राणे, उपसरपंच विद्यार्थी जाधव, ग्रामविकास अधिकारी विरेश कदम, मार्गदर्शक दिनेश राणे, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारीवर्ग यांचे मोलाचे योगदान आहे. तसेच विरसई जनसेवा मंडळ (मुंबई/ग्रामीण)चे सर्व पदाधिकारी, विरसई जनसेवा महिला मंडळचे पदाधिकारी, विरेश्वर विद्यालय विरसई येथील विद्यार्थी- शिक्षक व कर्मचारीवर्ग, जि.प. आदर्श मराठी शाळेतील विद्यार्थी -शिक्षक, अंगणवाडी सेविका - मदतनीस तसेच आदर्श गाव विरसईतील लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व ग्रामस्थांचे हे एकत्रित यश आहे.
पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि शाश्वत विकासाच्या दिशेने विरसई गावाने उभा केलेला आदर्श संपूर्ण कोकणासाठी प्रेरणादायी आहे. अशी माहीती विरसई जनसेवा मंडळ रजि.मुंबईचे सचिव सुरेश बेटकर यांनी दिली.



