*50 ते 60 वर्षापासून अतिक्रमण करून राहत असलेले घरांना सिटीसर्वे लागू करा-बेघर संघर्ष समितीची मागणी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*50 ते 60 वर्षापासून अतिक्रमण करून राहत असलेले घरांना सिटीसर्वे लागू करा-बेघर संघर्ष समितीची मागणी*
*50 ते 60 वर्षापासून अतिक्रमण करून राहत असलेले घरांना सिटीसर्वे लागू करा-बेघर संघर्ष समितीची मागणी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शहरात गोर गरीब कुटुंब गेल्या 50 ते 60 वर्षापासून अतिक्रमण जागेवर घरे बांधून रहात आहे. अशांनी त्याच जागेवर राहून मतदानाच्या हक्क बजावला, मुलांच्या शिक्षण पालन पोषण त्याच जागेवर केला, घरपट्टी, नळपट्टी घरपट्टी त्याच जागेवर राहून भरली, अशांना मालकीहक्क मिळावा म्हणून अतिक्रमण केलेल्या धारकांना सिटीसर्वे लागू करावे. तसेच 5 वर्षापासून धुळकात पडलेली 240 घरकुले लवकरात लवकर वाटप करण्यात यावे. आणि नवीन घरकुल खुडाई माता टेकडी, इमाम बादशा टेकडी या ठिकाणी बांधण्यात यावे असे विविध मागण्यासाठी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 जानेवारी 2026 रोजी बेघर संघर्ष समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दिलावर शाह कादर शाह यांच्या अध्यक्षतेखाली एकदिवसीय आंदोलन करण्यात आले, सदर निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष रेहाना गणी खाटीक, रुकैय्या पठाण, शुभांगी कासार, योगिता पाटील, लता पाटील, संगीता जगताप, इस्माईल अन्सारी, सायरा अन्सारी, हसीना शेख, नसीम पिंजारी, व कार्यकर्ते सह शेकडो लाभार्थी उपस्थित होते.



