*कळसवली ग्रामपंचायत येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कार्यशाळा उत्साहात पार*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कळसवली ग्रामपंचायत येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कार्यशाळा उत्साहात पार*
*कळसवली ग्रामपंचायत येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कार्यशाळा उत्साहात पार*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील ग्रामपंचायत कळसवली मध्ये 12 सप्टेंबर 2025 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कार्यशाळा उत्साहात पार पडली. स्थानिक स्वराज्य संस्थांना सक्षम बनविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान चालू केले आहे. येणाऱ्या 17 सप्टेंबर 2025 पासून या अभियानाची सुरुवात होणार आहे. त्याचीच पूर्वतयारी म्हणून ग्रामपंचायत कळसवली येथे ग्रामस्तरीय कार्यशाळा अत्यंत उत्साहात पार पडली. त्यावेळी ग्रामपंचायत कळसवली चे सरपंच, उपसरपंच, सदस्य व सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कार्यशाळेदरम्यान अभियानाचे स्वरूप कसे असणार आहे, त्यामध्ये कोणते घटक असणार आहेत यावर मार्गदर्शन करण्यात आले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे ग्रामपंचायतींना सक्षम बनविण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरणार आहे. सुशासनयुक्त पंचायत, गावपातळीवर संस्था सक्षमीकरण, लोकसहभाग आणि श्रमदान माध्यमातून लोकचळवळ निर्माण करणे, जल समृध्दी स्वच्छ व हरित गाव, मनरेगा व इतर योजनांशी अभिसरण, सक्षम पंचायत (स्वनिधी व लोकनियोजन), उपजीविका विकास सामाजिक न्याय आदी या अभियानाची वैशिष्ट्ये असून विकसित महाराष्ट्र करिता पंचायत राज संस्था अधिक गतिमान करणे हा त्यामागील हेतू आहे. पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींना तालुका स्तर, जिल्हा स्तर, विभाग स्तर आणि राज्य स्तर या चारही स्तरांवर भरघोस अशी बक्षीसाची रक्कम दिली जाणार आहे. त्यामुळे गावाचा विकास साधण्यास सुद्धा मदत होणार आहे. आणि असे हे अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी अभियानाची पूर्वतयारी म्हणून ग्रामपंचायत कळसवलीने त्यांची कार्यशाळा आयोजित करून गावास्तरावरील सर्व विभागाना अभियानामध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.