*वीरशैव कक्कया ढोर समाजाचे दि. 7 जुलै रोजी राज्यव्यापी धरणे आंदोलन*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*वीरशैव कक्कया ढोर समाजाचे दि. 7 जुलै रोजी राज्यव्यापी धरणे आंदोलन*
*वीरशैव कक्कया ढोर समाजाचे दि. 7 जुलै रोजी राज्यव्यापी धरणे आंदोलन*
मुंबई(प्रतिनिधी):-चलो आझाद मैदान, उठ कक्कया जागा हो, महामंडळाचा धागा हो! वीरशैव कक्कया ढोर समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्याच्या हक्काचे आर्थिक विकास महामंडळ मिळवून देण्यासाठी तळागातील ढोर (कक्कया) बांधवाना आता एकजूट दाखवण्याची वेळ आली आहे. आपला समाज आजवर अनेक पक्षाचा दावणीला बांधला गेला. त्यांनी आपला स्वार्थ साधून घेतला. पण समाज मात्र मागे राहिला. या समाजाला योग्य दिशा देण्यासाठी, येणाऱ्या भावी पिढीचे भविष्य घडविण्यासाठी, आपापसातील मतभेद बाजूला सारून पावसाळी अधिवेशनात सरकारला घेराव घालण्यासाठी सज्ज होण्याची वेळ आली आहे.गेल्या वर्षी 28 जूनला संत कक्कया स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाच्या मागणीसाठी आझाद मैदानात हजारो बांधवाच्या साक्षीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले होते. याची दखल घेऊन माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संत कक्कय्या समाजाला महामंडळ दिले जाण्याची घोषणा केली. परंतु ती घोषणा हवेतच विरली.संत कक्कय्या समाजाच्या मागणी नंतर सरकारने इत्तर समाजाला निवडणुका डोळ्या समोर ठेऊन महामंडळ देऊ केले. परंतु संत कक्कय्या समाजाने पाठपुरावा करुन सुद्धा महामंडळ दिले नाही. यासाठीचं पुन्हा एकदा संत कक्कय्या समाजाने आझाद मैदान येथे 7 जुलै 2025 रोजी एकदिवशीय धरणे आंदोलन करण्याची घोषणा केली असून त्या निमित्ताने वीरशैव कक्कया कल्याण मंडळाचे सर्व पदाधिकारी पायाला भिंगरी लावून मुबंई सह संपूर्ण महाराष्ट्र पिंजून ढोर समाजाला या आंदोलनात सहभागी होण्याचे अवाहन करीत आहेत आणि त्याला प्रतिसाद मोठया प्रमाणात मिळत आहे. ढोर(कक्कया) समाजांच्या न्याय हक्कासाठी आजपर्यंत कुठल्याही सरकारकडून ढोर (कक्कया) समाजाला पुरेपूर न्याय मिळाला नाही आणि ढोर समाजाने सुद्धा कुठलेही आंदोलन करून आपल्या न्याय हक्कासाठी मागणी केली नाही. पण आजची परिस्थिती आणि उद्याची चिंता व्यक्त करता (ढोर कक्कया) समाजाला अधिक अडचणीचा सामना करावा लागणार आहे. कारण उद्योग व्यवसायातून आणि शिक्षणातून आर्थिक बळ नसल्यामुळे हा समाज उद्योग व्यवसायातून वंचित होत चालला आहे.
सरकारकडून दिवसेंदिवस जातीचे आरक्षण धोक्यात येत आहे. आपल्या समाज बांधवांना रिझर्वेशनचा धोका होणार आहे, त्यामुळे शैक्षणिकदृष्ट्या आणि व्यावसायिक दृष्ट्या समाज मोठ्या संख्येने मागे पडताना दिसणार आहे. गेल्या पन्नास वर्षापासून असणारे लिड कॉम महामंडळ हे संत रोहिदास महामंडळ झाले आहे. पण त्याच्यावर कोणत्याही नेतेमंडळींनी ब्र शब्द केला नाही. या पन्नास वर्षात या महामंडळातून किती वाटा ढोर(कक्कया) समाजाला मिळाला याचे निदान केल्यावर असे कळाले की फक्त दोन टक्के सुद्धा नाही. याचा अर्थ काय? आम्ही अतिशय श्रीमंत आहोत. की, आम्ही अतिशय शूद्र आहोत. आम्हाला शासकीय आमच्या हक्काचे अनुदान मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. या सर्व गोष्टींना वाचा फोडण्यासाठी, आज आम्हाला आमचे स्वतंत्र संत कक्कया आर्थिक विकास महामंडळ झाले पाहिजे आणि ते आपण मिळवल्या शिवाय शांत बसायचे नाही.
समाजात एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्यांनी आपल्या पुढील पिढीचा विचार करता एकत्र येऊन हे आंदोलन यशस्वी करायचे आहे. आज जर तुम्ही मागे राहिलात तर भविष्यात ही पिढी तुम्हाला माफ करणार नाही. आंदोलनात कुणी लहान मोठा नाही तर हे आंदोलन आपल्या पुढच्या पिढीचे जीवन सुककर करण्यासाठी आहे. हे लग्नाचे आमंत्रण नाही की मला मिळाले नाही म्हूणन येणार नाही तर आपल्या समाजातील मुलांचे भविष्य उज्वल करण्यासाठी आहे याचे भान असू दया.
एक दिवस समाजासाठी, समाजातील तरुण पिढीच्या भविष्यासाठी 7 जुलैला सकाळी 10 वाजता महाराष्ट्रातील तमाम ढोर (कक्कया) बांधवानी एकत्र येऊन आझाद मैदानात धरणे आंदोलन करुन संत कक्कया समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास सरकारला भाग पाडू. उठ कक्कया जागा हो, महामंडळाचा धागा हो! आता नाही तर कधीच नाही
श्री दत्ता श्रावण खंदारे धारावी
९६९९३१३६२१