ताजा खबरे:
*जिल्हा परिषद गुजरभवाली शाळा प्रवेशोत्सव मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न*
*शिक्षणमहर्षी दादासाहेब राऊळ प्राथमिक शाळेत नवागतांचे मोठ्या दिमाखात स्वागत,मिरवणूक काढून केले नवागतांचे स्वागत*
*जलसाक्षरता समिती अक्राणी,श्रमेव जयते कुकलटपाडा*
*दुधाळ गाईंच्या लाभावरून आदिवासींमध्ये संताप, तळोद्यात 16 जून रोजी रास्ता रोको आंदोलन*
*शाळा प्रवेशोत्सव 2025 पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांसह मान्यवर करणार विद्यार्थ्यांचे स्वागत*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*जलसाक्षरता समिती अक्राणी,श्रमेव जयते कुकलटपाडा*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*जलसाक्षरता समिती अक्राणी,श्रमेव जयते कुकलटपाडा*

  • Share:

*जलसाक्षरता समिती अक्राणी,श्रमेव जयते कुकलटपाडा* 

तळोदा(प्रतिनिधी):-सातपुड्याच्या पाचव्या रांगेत अत्यंत दुर्गम डोंगराच्या कुशीत वसलेलं, स्वातंत्र्यपुर्व काळा पासुन पाणी टंचाईग्रस्त गाव – कुकलट अक्राणी तालुक्यातील ,पुर्वी राजबर्डी ग्रामपंचायतीचा भाग असलेलं. उंच सखल डोंगरावर वसलेलं हे गाव जणू " पावसाळ्यात निसर्गाने सुंदर, पण नियतीने कठीण" अशी अवस्था. या पाड्याची व्यथा कोणत्याही ग्रामीण भागातील लोकांसाठी अनोखी नाही–उन्हाळ्यात कोरड्या पडणाऱ्या विहिरी, शेतात मातीपेक्षा जास्त दगड, आणि रोजच्या पिण्याच्या पाण्यासाठीची वणवण. विशेषतः पावसाळ्यात माती वाहून जाई म्हणुन शेतजमीन वर्षानुवर्षं  नापिक होत गेली. लोकांनी आशा सोडून केवळ देवाचा आधार धरलेला. गावातल्या लग्नाळु मुलांना कुणी मुलगी देत नाही कारण भीषण पाणी टंचाई.
पण… या गावाने परिस्थितीचा रडगाणं न गाता, एकत्र येऊन स्वतःच्या श्रमातून नवा इतिहास घडवला. "मन जिंकलं. पाणी जिंकलं!" पावसावर आणि सरकारवर अवलंबून राहणं थांबवून, आपली लढाई आपणच लढायची हे ठरवलं.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान, लोक निराश होते. लसीकरणाबाबतही सकारात्मकता नव्हती. त्याच काळात भरत पावरा यांनी कुकलटपाड्याच्या पाणी टंचाईची व्यथा जलप्रेमी डॉ. एच. एम. पाटील यांच्यापर्यंत पोहोचवली.
ते फक्त शिक्षक नाहीत – ते पर्यावरणवादी, आणि ‘स्वतः कृती करणं’ हाच धर्म मानणारे कार्यकर्ते. त्यांनी वेळ, ज्ञान आणि ऊर्जा या तिन्हींचा मेळ घालून काहीतरी करणं गरजेचं मानलं. त्यांनी प्रथम गावकऱ्यांशी संवाद साधला. सकारात्मक वातावरण तयार केलं. तरुणांशी संवाद साधून WhatsApp गट तयार केला. विश्वास निर्माण केला. प्रेरणा दिली आणि ‘आपलं पाणी, आपणच वाचवायचं’ या विचाराने युवाशक्तीला एकत्र केलं. "श्रम हीच खरी शक्ती!" "हे काम सरकार करेल", "मनरेगाची वाट पाहू", हे अनुभवी लोकांच ऐकत राहिलो तर अजूनही काही वर्षं अशीच गेली असती. पण कुकलटपाडा वेगळं ठरलं. डाॅ पाटील यांच्या जलसाक्षरता समिती अक्राणीच्या नेतृत्वाखाली गावाने श्रमसंस्कारांची कास धरली. तरुण, विद्यार्थी, महिला, वृद्ध सर्वांनी शेकडो हातांनी पुढाकार घेतला: CCT (Continuous Contour Trenches) खोदल्या – ज्या पावसाचे पाणी मातीच्या आत झिरपवतात.
साठवण बंधाऱ्यांची दुरुस्ती आणि गाळ काढला. दगडी बांध आणि नाल्याचं खोलीकरण केलं.
विहिरींचा तळ स्वच्छ केला. यामध्ये B.E., D.Pharm, कृषी पदविका धारक, ITI विद्यार्थी, न शिकलेले युवक, शाळेतली बालकं आणि जॉर्जिया देशात शिक्षण घेत असलेले तरुणसुद्धा सहभागी झाले!
"सहभाग सर्वांचा – काम सामूहिक!" या उपक्रमात योगदान देणारे हात वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे होते:
ग्रामपंचायतीने जेसीबी मशीन पुरवुन साठवण बंधारा दुरुस्त केला.
जायंट्स ग्रुप शहादा यांनी नाल्याच्या खोलीकरणासाठी अत्यल्प का असेना खर्च दिला पण मोठं मनोबल मिळालं. आपल्या व्यथा दुर करण्यासाठी शहरी हात सरसावलेत ही हुरुप वाढविणारी बाब ठरली. महिलांनी, युवतींनी झोकून सहभाग घेतला. पोलिस पाटील, माजी सरपंच, आणि जेष्ठ नागरिकांचे सहकार्य मिळाले. श्रमपरिहारा नंतर ढोल-ताशाच्या गजरात जायंटस परिवारा सोबत गावकरी नाचले तो एक सामाजिक अभिसरणाचा व आत्मविश्वास वाढवणारा उत्सव होता. "पाण्याबरोबर पर्यावरणसंवर्धनही!" जलसंधारणाच्या जोडीला पर्यावरण रक्षणाची जबाबदारी देखील पार पाडण्यात आली:
प्लास्टिक मुक्ती मोहीम राबवली.
टाकावु प्लास्टिकच्या बाटल्यांमधून जलदाणी व अन्नदाणी तयार करून झाडांवर लावल्या. लहान मुलांनी प्लास्टिकपासून कलाकृती तयार केल्या. जमा केलेल्या स्थानिक बियांची नर्सरी उभारली. वृक्षारोपण आणि संवर्धन
या उपक्रमात मुलं, महिलाही सक्रिय सहभागी झाल्या. गुटखा, तंबाखु,व दारु पासुनच्या व्यसनमुक्तीचा आणि सामाजिक शुद्धीकरणाचा संदेशही गावभर पोहोचला.  "जलक्रांतीचे चमत्कारिक परिणाम!" या श्रमयज्ञाचे परिणाम थक्क करणारे ठरले आहेत: आजही मे महिन्यातही विहिरी आणि कूपनलिकांमध्ये पाणी शिल्लक राहते. रब्बी हंगामात पिके घेणाऱ्यांची संख्या 10 पटीनं वाढली. शेजारील आदिवासी पाड्यांनाही जललाभ होतोय.
50 वर्षांपूर्वी कोरडा पडलेला झरा पुन्हा उगम पावला व चमत्काराचा भाग ठरला. डाॅ. पाटील यांनी चमत्कार वा  अंधश्रद्धेपेक्षा विज्ञानाधिष्ठित श्रमाचं महत्त्व पटवलं.जिथं आधी लोक देवी-देवतांचे नवस करत होते, तिथं आता लोक श्रमाचे महत्त्व समजू लागले आहे. "जलसाक्षरतेचा परिपाठ!" आज कुकलटपाडा अभ्यासाचा केंद्रबिंदू बनला आहे. औरंगाबाद व इतर जिल्ह्यांतील विद्यार्थी येथे मॉडेल ग्राम म्हणून भेट देतात. कृषी विज्ञान केंद्र, कोळदा यांनी वीस हजार रुपयांचे चारा बियाणे मोफत दिले. त्याची बांधावर, डोंगर उतारांवर लागवड झाली. यामुळे गुरांसाठी चारा मिळाला, आणि पाण्याचा साठाही वाढला. "शासन दरबारी ठसठशीत उपस्थिती"
जलसाक्षरता समितीने शासन दरबारी ठोसपणे मांडणी केली.
वनसंरक्षकांना मनरेगातील मंजुरीसाठी विनंती केली. या कामामुळे सरकारही प्रेरित होऊन सहकार्य करतंय. "माध्यमांची दखल –ग्रामीण भारताचं प्रेरणास्थान" पूर्वी ज्याचं नाव कुठेही झळकलं नव्हतं, तो कुकलट गाव आज सोशल मिडिया, वृत्तपत्रांतून वाखाणलं जातंय.
"कोंबड्याच्या आरवण्यावर नाव मिळालेलं गाव", आज जलप्रेरणेचं प्रतीक बनलंय.
"निष्कर्ष: श्रमेव जयते – एका आशावादाची गोष्ट" कुकलटपाडा ही कहाणी श्रद्धेची नव्हे, तर कृतीची आहे. ही गोष्ट आहे:
एका ज्ञानकर्मी, शिक्षकाच्या दूरदृष्टीची, युवकांच्या सामूहिक श्रमसाधनेची
आणि एका छोट्याशा गावाने शाश्वत विकासाकडे टाकलेल्या निर्धारपूर्वक पावलांची!
या गावाने सरकारची वाट न पाहता स्वतःचा घाम ओतून ‘जलसंपत्ती’ निर्माण केली. आज ती संपत्ती केवळ पाण्याची नाही – ती आहे आत्मगौरवाची, शाश्वततेची आणि प्रेरणेची!

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*जिल्हा परिषद गुजरभवाली शाळा प्रवेशोत्सव मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न*
June, 16 2025
*शिक्षणमहर्षी दादासाहेब राऊळ प्राथमिक शाळेत नवागतांचे मोठ्या दिमाखात स्वागत,मिरवणूक काढून केले नवागतांचे स्वागत*
June, 16 2025
*जलसाक्षरता समिती अक्राणी,श्रमेव जयते कुकलटपाडा*
June, 16 2025
*दुधाळ गाईंच्या लाभावरून आदिवासींमध्ये संताप, तळोद्यात 16 जून रोजी रास्ता रोको आंदोलन*
June, 15 2025
*शाळा प्रवेशोत्सव 2025 पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांसह मान्यवर करणार विद्यार्थ्यांचे स्वागत*
June, 15 2025

थोडक्यात बातमी

*जिल्हा परिषद गुजरभवाली शाळा प्रवेशोत्सव मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न*
June, 16 2025
*शिक्षणमहर्षी दादासाहेब राऊळ प्राथमिक शाळेत नवागतांचे मोठ्या दिमाखात स्वागत,मिरवणूक काढून केले नवागतांचे स्वागत*
June, 16 2025
*जलसाक्षरता समिती अक्राणी,श्रमेव जयते कुकलटपाडा*
June, 16 2025
*दुधाळ गाईंच्या लाभावरून आदिवासींमध्ये संताप, तळोद्यात 16 जून रोजी रास्ता रोको आंदोलन*
June, 15 2025
*शाळा प्रवेशोत्सव 2025 पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांसह मान्यवर करणार विद्यार्थ्यांचे स्वागत*
June, 15 2025

थोडक्यात बातमी

*जिल्हा परिषद गुजरभवाली शाळा प्रवेशोत्सव मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न*
June, 16 2025
*शिक्षणमहर्षी दादासाहेब राऊळ प्राथमिक शाळेत नवागतांचे मोठ्या दिमाखात स्वागत,मिरवणूक काढून केले नवागतांचे स्वागत*
June, 16 2025

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज