*अक्कलकुवा येथे शांतता समितीची बैठक गणेशात्सव व इतर सण-उत्सव शांततेत साजरे करण्याचे आवाहन, 3 लाख रूपये किंमतीचे 18 मोबाईल मूळ मालकांना परत*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अक्कलकुवा येथे शांतता समितीची बैठक गणेशात्सव व इतर सण-उत्सव शांततेत साजरे करण्याचे आवाहन, 3 लाख रूपये किंमतीचे 18 मोबाईल मूळ मालकांना परत*
*अक्कलकुवा येथे शांतता समितीची बैठक गणेशात्सव व इतर सण-उत्सव शांततेत साजरे करण्याचे आवाहन, 3 लाख रूपये किंमतीचे 18 मोबाईल मूळ मालकांना परत*
नंदुरबार(प्रतिनिधी):-7 सप्टेंबर 2026 रोजी आगामी गणेशत्सव व इतर सण-उत्सव शांततेत, उत्साहपूर्ण वातारवणात तसेच सामाजिक सलोखा व बंधुभाव कायम राखून साजर व्हावेत आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अक्कलकुवा पोलिस ठाणे हद्दीत शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली. पोलिस अधिक्षक नंदुरबार श्रीमती. आश्विनी सानप यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय अक्कलकुवा येथील सभागृहात ही बैठक पार पडली. सदर बैठकीस अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमश्या पाडवी, उपविभागीय पोलिस अधिकारी, सुभाष भोये, तहसीलदार विनायक घुमरे, अक्कलकुवा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अर्जुन पटले, गटविकास अधिकारी विजय अहिरे, अक्कलकुवा ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती. उषा बोरा यांच्यासह शासकीय विभागांचे अधिकारी, गणेश मंडळांचे पदाधिकारी, शांतता समितीचे सदस्य, पोलीस पाटील, सामाजिक, राजकीय व व्यापारी क्षेत्रातील प्रतिनिधी तसेच प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
बैठकीदरम्यान आगामी गणेशत्सव व इतर सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक गार्ग, वाहतुक व्यवस्था, ध्वनीक्षेपकचा मर्यादित व नियमबद्ध वापर, विदयुत तारांपासून सुरक्षितता, विसर्जनावेळी घ्यावयाची खबरदारी, गर्दीचे नियोजन तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या. गणेश मंडळांनी प्रशासन व पोलीस विभागाशी समन्वय ठेवून प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहान करण्यात आले.
तसेच सोशल मिडीयावर अफवा, आक्षेपार्ह अथवा सामाजिक तेढ निर्माण करणारा मजकूर अथवा पोस्ट प्रसारित करू नये, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच अनुचित घटना घडणार नाही यासाठी सर्वानी दक्षता घेऊन पोलिस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहान करण्यात आले. बैठकीस गणेश मंडळांचे पदाधिकारी, शांतता समितीचे सदस्य, गावनिहाय पोलीस पाटील व प्रतिष्ठित नागरिक असे अंदाजे 300 ते 350 जण उपस्थित होते. 3 लाख रूपये किंमतीचे 18 मोबाईल मूळ मालकांना परत
संबधित नागरिकांनी समाधान व्यक्त केले. तर अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक, अर्जुन पटले यांनी आभार मानले.



