*बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील 'कॉर्पोरेट जिहाद' व धर्मांतराचे षड्यंत्र रोखा-हिंदु जनजागृती समितीची प्रशासनाकडे मागणी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील 'कॉर्पोरेट जिहाद' व धर्मांतराचे षड्यंत्र रोखा-हिंदु जनजागृती समितीची प्रशासनाकडे मागणी*
*बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील 'कॉर्पोरेट जिहाद' व धर्मांतराचे षड्यंत्र रोखा-हिंदु जनजागृती समितीची प्रशासनाकडे मागणी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील 'कॉर्पोरेट जिहाद' व धर्मांतराचे षड्यंत्र रोखा, हिंदु जनजागृती समितीची प्रशासनाकडे मागणी
तसेच राष्ट्रघातकी आतंकवादी स्लीपर सेलची सखोल चौकशी करा अशा विविध मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आज नंदुरबार निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हा दंडाधिकारी आशा संघवी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री तथा गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी अधिवक्ता सौ.उमा प्रकाश चौधरी (नंदुरबार जिल्हा महिला आयोग समन्वयक), डॉ. रजनी नटावदकर, डॉ.ध्वनी मयूर शाह, कु.अश्लेषा पवार, सौ.जॉली मयूर शाह, सौ.नयना मुळे, भावना कदम, सौ. आशाबाई वाडिले, हिंदुत्वनिष्ठ मयूर चौधरी, किशोर पवार, हर्षल देसाई, रवींद्र पवार आणि हिंदु जनजागृती समितीचे नंदुरबार जिल्हा संघटक राहुल मराठे उपस्थित होते. नाशिक येथील एका बहुराष्ट्रीय कंपनीत हिंदू महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण, धर्मांतरासाठी दबाव, गोमांस भक्षणाची सक्ती आणि नमाज पठणाचे जे धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत, त्यामागील विखारी जिहादी मानसिकता आणि संघटित गुन्हेगारी मोडीत काढावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे. हे केवळ नाशिकपुरते मर्यादित नसून मुंबईसह देशातील इतर शाखांमध्ये पसरलेले मोठे 'कॉर्पोरेट जिहाद' असू शकते. यामागील 'लव्ह जिहाद', 'धार्मिक दहशत' आणि 'धर्मांतर रॅकेट'चा सखोल तपास करून यातील देशव्यापी साखळी उघड करावी, अन्यथा समिती जनआंदोलन छेडेल, असा इशारा समितीने एका निवेदनाच्या माध्यमांतून नाशिकचे पोलीस आयुक्त यांच्यासह नंदुरबार जिल्ह्यातील अन्य ठिकाणी जिल्हा प्रशासनाला देण्यात आला आहे. यात अनेक ठिकाणी समितीच्या रणरागिणी या महिला शाखेतील युवती व महिलांचा सहभाग लक्षणीय होता. सदर कंपनीत 7 आरोपींना अटक झाली आहे. नाशिकमध्ये 7 सापडले, तर अन्य शहरात किती असतील ? हे केवळ नाशिकपुरते मर्यादित नसून मुंबईसह देशातील इतर शाखांमध्ये पसरलेले मोठे 'कॉर्पोरेट षड्यंत्र' असू शकते. यामागील 'लव्ह जिहाद' आणि 'धर्मांतर रॅकेट'चा सखोल तपास करून यातील व्यापक तपास होण्याची आवश्यकता आहे. ज्या कंपन्यांमध्ये हिंदू महिलांच्या अब्रूचे रक्षण होत नाही आणि जिथे 'धार्मिक दहशत' निर्माण केली जाते, अशा कंपन्यांचा व्यवसाय परवाना रद्द करून त्यांना टाळे ठोकण्यात यावे तसेच राज्यातील सर्व आयटी आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचे तात्काळ 'विशेष सुरक्षा आणि धार्मिक भेदभावविरोधी ऑडिट' करण्याचे आदेश सरकारने द्यावेत. प्रभु श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकच्या भूमीत जर 'कॉर्पोरेट'च्या नावाखाली हिंदू महिलांची अब्रू लुटली जात असेल, तर हिंदू समाज शांत बसणार नाही. जर प्रशासनाने या नराधमांवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या व्यवस्थेवर त्वरित कठोर कारवाई केली नाही, तर हिंदु जनजागृती समिती समस्त हिंदू संघटनांच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडेल, असा इशारा समितीने या प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.



