*भारतीय संगीत हे जगात लोकप्रिय-रश्मिकांत त्रिवेदी*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*भारतीय संगीत हे जगात लोकप्रिय-रश्मिकांत त्रिवेदी*
*भारतीय संगीत हे जगात लोकप्रिय-रश्मिकांत त्रिवेदी*
नंदूरबार(प्रतिनिधी):-पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळ नंदुरबार संचलित शहरातील एकलव्य विद्यालय येथे जागतिक संगीत दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुहासिनी नटावदकर यांनी भूषवले विद्येची देवी सरस्वती यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्यावेळी विद्यालयाच्या विद्यार्थिनी रेवा पवार व सिद्धी श्रॉफ यांनी हे शारदे माँ, हे शारदे माँ, अज्ञानता से हमे तार दे माँ या गाण्यावरील नृत्याच्या माध्यमातून देवी सरस्वती ला अभिवादन केले.
रश्मिकांत त्रिवेदी हे कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते होते. त्यांनी आपल्या मनोगतामध्ये भारतीय संगीताचे महत्त्व सांगितले व म्हणाले की 21 जून 1982 रोजी फ्रान्समध्ये सर्वप्रथम जागतिक संगीत दिन साजरा करण्यात आला आणि त्या वर्षापासून पुढॆ आजपर्यंत हा दिन 21 जून रोजी जागतिक संगीत दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. त्यासाठी दरवर्षी एक थीम ठरवण्यात येते. 2025 या वर्षासाठीची थीम आहे 'Healing through Harmony.' इंग्रजी भाषेत संगीताचे महत्त्व पटवून देताना ते म्हणाले, Indian classical music plays a vital role in preserving cultural heritage. Providing spiritual and emotional nourishment,enhancing mental abilities, developing creativity, and promoting cultural diversity.
Advantages of Indian classical music.
Decreases BP, boosts memory, Sparks creativity, reduces stress levels, Surcharges brainpower,fight depression, puts you to sleep, Relieves pain, makes you happy, improves reproductivity & spiritual development. सर्व ललित कलांमध्ये संगीत ही सर्वश्रेष्ठ कला मानली जाते. कलेचे दोन प्रकार आहेत ललित कला व इतर कला. ललित कला ही मानवाला मानसिक, आत्मिक व भावनिक आनंद देते, सौंदर्याचा अनुभव देतॆ व इतर कला जसे शिवण कला, पाककला, या कलांमुळे मानवाच्या व्यावहारीक गरजा पूर्ण होतात त्यांना भौतिक सुख देतात.
कित्येक भारतीय लोकवाद्यं ही भारतीय संगीतकारांनी जगप्रसिद्ध केली आहेत. त्यात काश्मिरी लोकवाद्य संतूर हे पंडित शिवकुमार शर्मा यांनी, तसेच सनई (शहनाई) हे वाद्य उस्ताद बिस्मिल्ला खान यांनी जगप्रसिद्ध केले आहे. तसेच सितार हे भारतीय वाद्य जगात सर्वाधिक लोकप्रिय आहे.
आपल्या देवी- देवतांच्या हातात सुद्धा आपण संगीताची वाद्ये बघतो. उदाहरणार्थ देवी सरस्वती जवळ विणा, श्रीकृष्णां जवळ मुरली, श्री गणेशां जवळ मृदुंग ही वाद्य आपल्याला दिसून येतात म्हणजेच देवी- देवतांना ही संगीत खूप आवडते.
'गीतम् वाद्यम् नृत्यम् त्रयम् संगीत मुच्यते.' या संगीताच्या व्याख्येप्रमाणे आपल्या शाळेमध्ये सुद्धा आपण गायन वादन आणि नृत्य याचा आनंद वर्षभर घेत असतो, विशेषता: वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये.
आपला आदिवासी जिल्हा हा सुद्धा सांस्कृतिक परंपरेसाठी सुप्रसिद्ध आहे. यॆथील लोकवाद्यं, लोकसंगीत, लोकनृत्य, विशेषतः
काठीचा होलिकोत्सव हा सुद्धा सुप्रसिद्ध आहे. लोकनृत्य हा सुद्धा संगीताचाच एक भाग आहे.
आजच्या जागतिक संगीत दिनाच्या दिवशी लोकं, वाद्य वाजवून, नृत्य करून, गाऊन तो दिवस सर्वत्र साजरा करत असतात.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरीशंकर धुमाळ यांनी केले. उपमुख्याध्यापिका शैलजा कापडिया, धर्मेंद्र मराठे, मिलिंद वडनगरे, टीका पाडवी, वसंत वसईकर यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला होती. तसेच धोंडीराम शिनगर यांनी आभार मानले.