*मनसेचे महावितरण कार्यालयावर 'टाळे ठोक आंदोलन' यशस्वी, वीज प्रश्नावर प्रशासनाला आणले वठणीवर*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मनसेचे महावितरण कार्यालयावर 'टाळे ठोक आंदोलन' यशस्वी, वीज प्रश्नावर प्रशासनाला आणले वठणीवर*
*मनसेचे महावितरण कार्यालयावर 'टाळे ठोक आंदोलन' यशस्वी, वीज प्रश्नावर प्रशासनाला आणले वठणीवर*
विरार(प्रतिनिधी):-पूर्वेकडील मनवेलपाडा, कारगिल नगर, कोकण नगर आणि लगतच्या परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या वारंवार वीज खंडितच्या समस्येविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) वतीने पुकारलेले 'टाळे ठोक आंदोलन' यशस्वी ठरले आहे. संतप्त नागरिकांच्या साथीने मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या विरार विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना घेराव घालत त्यांच्यासमोर प्रश्नांची सरबत्ती केली आणि मागण्यांचा कृती आराखडा मंजूर करून घेतला. वीज समस्येने नागरिक त्रस्त; अपघाती मृत्यूने संतापाची लाट
गेल्या अनेक महिन्यांपासून या परिसरातील नागरिक वीजपुरवठ्यातील एम बिघाडामुळे त्रस्त आहेत. वाढती लोकसंख्या, जुनी वीज यंत्रणा, अतिभारित ट्रान्सफॉर्मर आणि अपुरे मनुष्यबळ यामुळे दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यातच विरार पूर्वेतील तरुण गौरव सुरेश गोरे याच्या विजेशी संबंधित दुर्दैवी अपघाती मृत्यूमुळे महावितरणच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराविरोधात दाद मागण्यासाठी मनसे, विरार शहर (प्रभाग क्र.6) च्या वतीने हे 'टाळे ठोक आंदोलन' करण्यात आले.
आंदोलनातील प्रमुख मागण्या आणि यश:मनसेने महावितरण प्रशासनासमोर 14 प्रमुख मागण्यांचे निवेदन सादर केले. प्रशासनाने या मागण्या गांभीर्याने घेत सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिले आहे. यातील प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे:
नवीन उपकेंद्र: मनवेलपाडा, कारगिल नगर, कोकण नगरसाठी स्वतंत्र 22/33 केव्ही वीज उपकेंद्र (Substation) उभारण्याचा प्रस्ताव तातडीने मंजूर करणे. अपघाताची सखोल चौकशी: गौरव गोरे यांच्या मृत्यूप्रकरणी सखोल चौकशी करून जबाबदार अधिकारी व कंत्राटदारांवर कठोर कारवाई करणे. क्षमतेत वाढ व नवीन ट्रान्सफॉर्मर: अतिभारित ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवणे आणि कोकण नगर परिसरासाठी प्रलंबित स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर त्वरित बसवणे. कंत्राटदारांवर कारवाई: फॉल्ट दुरुस्तीला विलंब करणाऱ्या निष्काळजी कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करून महावितरणची स्वतःची सक्षम यंत्रणा उभी करणे.
स्मार्ट मीटरबाबत पारदर्शकता: स्मार्ट मीटर बसविण्यापूर्वी जनजागृती मोहीम राबवणे व बिलांबाबतच्या शंकांचे निरसन करणे. भूमिगत केबलिंग व आपत्कालीन पथक: वारंवार फॉल्ट होणाऱ्या वाहिन्यांचे भूमिगतकरण करणे आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र पथक नेमणे. अन्यथा अधिक तीव्र आंदोलनाचा इशारा या सर्व मागण्यांवर महावितरण प्रशासनाने निश्चित कालमर्यादेसह लेखी कृती आराखडा (Action Plan) सादर करावा, अशी ठाम भूमिका मनसेने घेतली. अधिकाऱ्यांनी मागण्या मान्य करून कार्यवाहीचे आश्वासन दिल्याने हे आंदोलन यशस्वी झाले. मात्र दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यास आणि नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरूच राहिल्यास यापुढे अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा सज्जड इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना, विरार शहर (प्रभाग क्र.6) च्या वतीने प्रशासनाला देण्यात आला आहे.



