*कार्यकर्त्यांनी निवडणुकीला प्रामाणिकपणे सामोरे जावं-आ. चंद्रकांत रघुवंशी*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कार्यकर्त्यांनी निवडणुकीला प्रामाणिकपणे सामोरे जावं-आ. चंद्रकांत रघुवंशी*
*कार्यकर्त्यांनी निवडणुकीला प्रामाणिकपणे सामोरे जावं-आ. चंद्रकांत रघुवंशी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेची युती कोणासोबत होईल हे आत्ताच सांगता येणार नाही. कुठलाही विचार न करता लढाऊ वृत्ती कार्यकर्त्यांनी ठेवावी. निवडणुकीत कार्यकर्त्यांनी टेन्शन घ्यायचं काम नाही मी बसलोय. सर्व कार्यकर्त्यांनी निवडणुकीला प्रामाणिकपणे सामोरे जाऊन पक्षाचं काम करावे असे आदेश शिवसेनेचे संपर्कप्रमुख आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी दिले. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीचा पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाची नंदुरबार तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची व्यापक बैठक संजय टाऊन हॉलमध्ये शनिवारी घेण्यात आली. त्याप्रसंगी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे. कोण उमेदवार आपल्या सोबत निवडणूक लढवणार याचा विचार कार्यकर्त्यांनी करायचा नाही. निवडणुकीत कार्यकर्त्यांनी लढाऊ वृत्तीने पक्षाचं काम करावं. आगामी नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका मोठ्या हिमतीने लढवायच्या आहेत.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी, माजी सभापती विक्रमसिंह वळवी, जि.प माजी सदस्य देवमन पवार, तालुकाप्रमुख डॉ. सयाजीराव मोरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रसंगी जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी म्हणाले, आगामी निवडणुकीमध्ये पक्ष संघटनेने आपला उमेदवार कसा निवडून येईल याकडे कार्यकर्त्यांनी लक्ष द्यावे. निवडणुकीचा काळ हा कार्यकर्त्यांसाठी संघर्षाचा असतो. सर्वांनी एकदिलाने काम करावं. यावेळी माजी जि.प अध्यक्ष वकील पाटील,जि.प अध्यक्ष रमेश गावित, शेतकी संघाचे अध्यक्ष बी.के पाटील, माजी सभापती विक्रमसिंह वळवी, जि.प माजी सदस्य देवमन पवार, बाजार समिती चेअरमन संध्या पाटील, शेतकी संघ सदस्य सुरेश शिंत्रे, माजी जि.प सदस्य अंबरसिंग पाडवी, शिवसेना उप जिल्हाप्रमुख कृष्णदास पाटील, तालुकाप्रमुख डॉ. सियाजीराव मोरे, युवासेना तालुका प्रमुख राजेश वसावे यांच्यासह नंदुरबार शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीचा पूर्वी अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेतील मृतात्म्यांना दोन मिनिट स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच जखमी झालेल्या बद्दल बद्दल सहवेदना व्यक्त करीत बरे होण्याची प्रार्थना करण्यात आली.