*RTI संरक्षण धरणे व भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन 16 जून रोजी मुंबईत*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*RTI संरक्षण धरणे व भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन 16 जून रोजी मुंबईत*
*RTI संरक्षण धरणे व भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन 16 जून रोजी मुंबईत*
मुंबई(प्रतिनिधी):-आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशनतर्फे माहितीचा अधिकार (RTI) व मानवाधिकार कार्यकर्त्यांवरील वाढते हल्ले, धमक्या, खोटे गुन्हे दाखल करणे, मानसिक छळ, प्रशासकीय अन्याय, माहिती आयुक्त कार्यालयातील पारदर्शकतेचा अभाव, संविधान व लोकशाही संरक्षण, मानवाधिकार संरक्षण, सामाजिक न्याय तसेच बेरोजगार युवक, शेतकरी, कामगार व सामान्य नागरिकांच्या न्याय्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी “RTI संरक्षण धरणे व भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन” आयोजित करण्यात आले आहे. देशभरात माहितीचा अधिकार वापरून भ्रष्टाचार उघड करणाऱ्या RTI कार्यकर्त्यांवर हल्ले, खोटे गुन्हे, धमक्या व विविध प्रकारचा दबाव वाढत असल्याची गंभीर बाब लक्षात घेऊन RTI कार्यकर्त्यांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र कायदा करण्यात यावा, तसेच भ्रष्टाचाराविरोधात प्रभावी कारवाई व्हावी या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून संविधानिक मूल्यांचे संरक्षण, लोकशाही बळकटीकरण, पारदर्शक प्रशासन, मानवाधिकार संरक्षण आणि सामाजिक न्याय या विषयांवर जनजागृती करण्यात येणार आहे. आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण, संविधानिक व लोकशाही मार्गाने करण्यात येणार आहे. आगामी आंदोलनाची भूमिका, उद्दिष्टे, प्रमुख मागण्या व पुढील कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी 11 जून 2026 रोजी दु. 3.30 ते 4.30 या वेळेत मुंबई मराठी पत्रकार संघ आझाद मैदान येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेत संस्थेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष कामेश घाडी तसेच राष्ट्रीय, राज्य व जिल्हास्तरीय पदाधिकारी उपस्थित राहून माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत. RTI संरक्षण धरणे व भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन 16 जून 2026
रोजी स. 10 ते सायंकाळी 6
या वेळेत आझाद मैदान, मुंबई येथे होणार आहे. यावेळी RTI कार्यकर्त्यांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र कायदा लागू करावा, RTI कार्यकर्त्यांवरील हल्ले, धमक्या व खोट्या गुन्ह्यांची विशेष चौकशी करावी, माहिती आयोगातील प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावीत, माहिती आयोग व शासकीय यंत्रणांमध्ये पारदर्शकता वाढवावी, भ्रष्टाचाराविरोधात प्रभावी व कठोर कारवाई करावी, संविधानिक अधिकार, मानवाधिकार व सामाजिक न्यायाचे संरक्षण करावे, बेरोजगार युवक, शेतकरी, कामगार व सामान्य नागरिकांच्या न्याय्य मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावेत. आदी प्रमुख मागण्या असणार आहेत देशभरातील RTI कार्यकर्ते, मानवाधिकार कार्यकर्ते, सामाजिक संघटना, पत्रकार, वकील, शेतकरी संघटना, कामगार संघटना, विद्यार्थी, युवक आणि जागरूक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या लोकशाही आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन RTI Human Rights Activist Association तर्फे करण्यात आले आहे.



